मराठी भाषा गौरव दिन

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजेच 27 फेब्रुवारीला दरवर्षी 2013 सालापासून मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्रभर आणि जिथे जिथे मराठी भाषा बोलणारे लोक आहेत तिथे तिथे साजरा केला जातो.

मराठी भाषा एक साहित्याची समृद्ध परंपरा असलेली अभिजात भाषा म्हणून ओळखली जाते. मराठी भाषेचा इतिहास अडीच हजार वर्षांचा आहे या अडीच हजार वर्षांमध्ये मराठी भाषेमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली. गाथासप्तशती कवी मुकुंदराज यांचा काव्यसिंधू संत ज्ञानेश्वरांची भावार्थदीपिका अर्थातच महाराष्ट्राचा भाषिक ठेवा ज्ञानेश्वरी पासून आजच्या सर्वसामान्य मराठी भाषिका पर्यंत अभिमानाने मिरवत आहे.

 कुसुमाग्रजांचा जन्म नाशिक येथे 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. कुसुमाग्रज हे जन्मजात प्रतिभावंत कवी होते याची साक्ष म्हणून काय जवळजवळ सोळा काव्यसंग्रह भरतील इतका काव्य  त्यांनी लिहिले आहे. विशाखा जीवनलहरी समिधा छंदोमयी अशाप्रकारे त्यांनी खूप सुंदर काव्यसंग्रह मराठी भाषेला दिले अतिशय सुंदर आणि भारदस्त विषय घेऊन त्यांनी मराठी भाषेत नाटके लिहिली नटसम्राट वीज म्हणाली धरतीला दुसरा पेशवा ही नाटके फारच प्रसिद्ध आहे.

अशा या कुसुमाग्रजांना त्यांच्या मेघदूत या कालिदास कृत संस्कृत  नाटकाच्या मराठी अनुवादाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला 1988 यावर्षी साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन कुसुमाग्रजांना गौरविले.

कवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषे ची सेवा करून साजरी केली पाहिजे असे मला वाटते जरी इंग्रजी भाषा हाच प्राबल्य वाढवीत असली तरी ती आपली मातृभाषा नाही ती परकी भाषा आहे फक्त कामा पुरती ठेवली पाहिजे आणि तिच्याकडून पाहिजे ते काम करून घेतले पाहिजे बस बाकी काही नाही. बाकी फक्त .....

जय मराठी 

जय महाराष्ट्र



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी बाणा व जिल्हा परिषद शाळा

कणा - कवी कुसुमाग्रज (kana poem by Kusumagraj)

वारी